display: inline-block;

May 28, 2015

अलंकरण आणि अविष्कार हे परस्परांपासून भिन्न असता कामा नये हे भारतीय कलेचे सूत्र -

अलंकरण आणि अविष्कार हे परस्परांपासून भिन्न असता कामा नये हे भारतीय कलेचे सूत्र -
"अभिजात" सत्यजित  रे यांची चित्रसंपदा (चिदानंद दासगुप्ताhttp://en.wikipedia.org/wiki/Chidananda_Dasgupta अनुवाद सुधीर नांदगावकर) खूप छोट पुस्तक पण अतिशय आशयपूर्ण आणि मह त्वाचे पुस्तक सत्यजित रे यांच्या समकालीन चिदानंद दासगुप्ता यांचे  कुठलीही तडजोड न करता  सत्यजित  रे यांच्या कामाचा आणि त्यातील विविध पैलूंचा  वेध घेतलेले सुंदर पुस्तक 
खरतर ह्या दोन शब्दांच्या आधाराने स्वतःचे परीक्षण करण्याचे ठरवले त्याच वेळेस स्वतःच्या प्रचंड मर्यादा जाणवू लागल्या 

अविष्कार आणि अभिव्यक्ती ज्या माध्यमांद्वारे मी करत आलो त्यात त्यांचा एकमेकांशी समन्वय कसा होत आला आणि ते  माझ्या अनुभवांद्वारे  कसे घडत गेले यांचा पाठपुरावा करावा अस वाटलं .  पण ह्या गोष्टी जरी मी आता लिहित असलो तरी ह्यांचा विचार माझ्यात सतत उद्दीपित होत होता एकमेकांसोबत आणि तो वेगळा करण माझ्य्साठी तसे  सहजशक्य नाही , कारण स्वतःचे कितीही म्हटलं तरी परखड परीक्षण करणे हे शक्य नाही , तसे कठीणच . बरेच संघर्ष होऊ लागतात स्वतःशीच , त्यामध्ये स्वतःशीच परीक्षण , निरीक्षण करणं तसं कठीणच होऊन बसतं , मग त्याचा सुवर्णमध्य म्हणजे त्या सर्व गोष्टीच प्रवाहीपण प्रामाणिकपणे जपणे आणि त्यानुसार आपल्या व्यक्तिमत्वातील विविध पैलू जोखणे.
तसेच  त्या प्रसृत होऊ देऊन त्यांच्यात असणार्या नैसर्गिकपणाने ते  उत्क्रांत होऊ देणे . त्याची जाणीव राहणे , खरतर माझ्या मनात हल्ली हे पुस्तक वाचल्यापासून माझ्या कलेचा भारीत्य संस्कृतीशी समन्वय कसा साधावा ह्याचा विचार  रुजत आहे . पण  त्याचवेळेस माझ्यामधील एक विचित्र असा गुंता माझ्यासमोर येतो . आणि तो थोडासा ह्या विचाराच्या अगतिक पणाला मारक  ठरतो तो म्हणजे "सहजता" पण हि सहजता कालाविष्कारादरम्यान  मिळवण्यापेक्षा तो  बर्याच वेगवेगळ्या क्षणी स्वतः मध्ये जाणवतो . त्या वेळी मन एका विशिष्ट क्रियाशीलतेच्या पातळीवर "conscious " असणे आणि त्याची जाण  कुठल्याही तडजोडीशिवाय स्विकारून  विचार आणि क्रियेच्या प्रक्रियेशी पूर्णपणे एकजूट होणे , तसेच तिला आतून मान्यता मिळणे आणि ह्या सर्व गोष्टी त्या एका क्षणात होत असतात आपल्यामध्ये  तसेच हा क्षण आपण साधला हे कामातून अट्टाहासाने  दाखवण्यापेक्षा तो अशाप्रकारे त्या प्रक्रियेचा भाग व्हावा कि त्याचे वेगळेपण दिसुन न येत तो त्या सर्व प्रक्रियेचाच भाग म्हणून परावर्तीत व्हावा . 
असा विचार सध्या सुरु आहे . 
खरी कसोटी असते ती अविष्कार होत असल्या  प्रसंगी घेतल्या जाणार्या  निर्णयांची  . त्याची साधने,माध्यमे   ह्यांची निवड  संवेदनशील असण्यासोबतच ते त्या ठिकाणी कसे अपरिहार्य असू शकेल हे हि  जास्त महत्वाचे होऊन जाते , माझा सर्व  प्रयास हा सह्जतेशी सलग्न असावा हा माझा नेहमीच प्रयत्न असतो . माझ्या प्रक्रियेचे मूळ प्रवाहात जरी असले तरी त्याचा प्रभाव , त्याचे परिणाम  हे बरेच गुंतागुंतीचे आहेत आणि ते तसे असण्यामागे  मानसिक आणि शारीरिक  जडण घडण आहे , आणि ह्यात आता आपल्या संस्कृतीचा समन्वय कसा साधावा तोही अपरिहार्य पणे ह्या जाणीवेच्या शोधात शांत आहे मी अट्टाहास नाही कुठला . 
नाद…  नादी नादी .
 समोर बीभत्स बीज . 
मनाच्या अट्टाहासाचे ,
संगम, संगत 
परावलंबी 
संपले ,
थिजले सर्व 
श्वासावाचुनी जिवंत . 

No comments:

Post a Comment